लहानपणी अर्धी राहिलेली गोष्ट चिमणीचे सगळे काम आटोपले ... ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की , अरेच्च्या ! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही . तिला विलक्षण अपराधी वाटलं . तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला . दाराबाहेर शांतता होती . ती शांतता चिमणीला असह्य झाली . तिनं तत्परतेनं दार उघडलं . दाराबाहेर कावळा नव्हता . तिने आजू बाजूला फिरून पाहिलं , कावळा कुठेही नव्हता .' गेला असेल कुठेतरी ... येईल परत ' …. तिने स्वत : च्या मनाची समजूत काढली . मात्र , रात्र मावळली ... दिवस उगवला , संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता . चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध - पावडर करण्यातही नाही … कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची … तो आवाज असा काही कानात साठला होता की