लहानपणी अर्धी राहिलेली गोष्ट 

 चिमणीचे सगळे काम आटोपले...

 

ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं  कीअरेच्च्याआपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाहीतिला विलक्षण अपराधी वाटलंतिनं बंद दारामागचा कानोसा घेतलादाराबाहेर शांतता होतीती शांतता चिमणीला असह्य झालीतिनं तत्परतेनं दार उघडलंदाराबाहेर कावळा नव्हतातिने आजू बाजूला फिरून पाहिलंकावळा कुठेही नव्हता.'गेला असेल कुठेतरी... येईल परत' …. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढलीमात्ररात्र मावळली... दिवस उगवलासंध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता.

 

चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही … कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची … तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं...

 

*अनेक दिवस उलटले ...*

 

चिमणीच्या मनातून काही कावळा जाईनामग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच असं ठरवून घरट्याबाहेर पाऊल ठेवलंमजल दरमजल करत फिरताना थकून एका झाडाच्या फांदीवर विश्रांती घेण्यासाठी ती थांबलीएवढ्यात त्याच झाडाच्या दुसऱ्या फांदीवरून चिरपरिचित आवाज तिच्या कानावर पडला... तो 'कावळ्याचाआवाज होतातो आवाज ऐकून चिमणीला कोण आनंद झालासारा थकवासारा शीण कुठल्या कुठे पळालातिने मोठ्या उत्साहाने त्या फांदीच्या दिशेने झेप घेतली.

 

 पहाते तर कायकावळा आपल्या घरट्यात आपल्या पिल्लांसोबत आनंदाने मौज मस्ती करत होताकावळ्याचं लक्ष चिमणीकडे गेलंचिमणीला पाहून त्याला फार आनंद झालातो आनंदाने म्हणाला, 'या या चिमणाबाईतुमचं स्वागत आहे आमच्या घरट्यात.

 

तुम्हाला भेटून खूप आनंद झालाबोलाकाय करू तुमच्यासाठी?' कावळ्याचं ते अगत्य पाहून चिमणी खूप ओशाळलीम्हणाली,

- 'तुला राग नाही आला माझा?'

 

का यावा?

 

मी माझ्यात विश्वात गुंग होते म्हणून?

 

छे छे!

 

-प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र विश्व असतं..जसं तुझं होतंतुला त्यात माझी गरज कधीच नव्हती ....माझी ती गरज होती म्हणून मी तुझ्या दाराशी आलोपण…..नंतर मला माझी चूक कळली.  माझी गरज भागवण्यासाठी तू तुझ्या विश्वातून बाहेर येउन मला साथ देणं किंवा तुझ्या विश्वात मला प्रवेश देणं या दोनीही गोष्टी 'अतिक्रमणा सारख्याचघडल्या असत्या नाही काआणि….कुणाच्याही वस्तूवरअधिकारावरभावविश्वावर 'अतिक्रमणकरण चूकच नाही काम्हणून….मग मी स्वत: वजा व्हायचं ठरवलं आणि निघालो एकटाच …. तुझ्या विश्वापासून दूर.

 

मला एकट करूनअरेमला सवय झालीय आता तुझी.

 

चिमणाबाईया जगात एकट कोणीच नसतंजेव्हा आपण एकट आहोतअसं वाटतं ना ..तेव्हा तो एकांतच असतो आपलासोबती ...जो दाखवत असतो आपल्याला वाट... आयुष्यातल्या पुढच्या प्रवासाची .

 

मलाही दाखवली त्याने आणि बघ ……. आज मी किती आनंदी आहे … माझ्या 'घरट्यात'… माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या 'माझ्या माणसांमध्ये'

 

चिमणी नि:शब्द होऊन तिथून निघाली तेव्हा कावळा तिला एवढंच म्हणाला -

 

चिमणाबाईमाझ्या घरट्यात तू केव्हाही येऊ शकतेस हो.

 

तुझी टकटक ऐकून मी लगेच दार उघडेल … क्षणाचाही विलंब  करताचिमणीचे डोळे पाणावले... भरल्या कंठाने निरोप घेऊन तिने परतीची झेप घेतली... आपल्या घरट्याकडे... पण

 

आज तिच्या पंखात पूर्वीइतक बळ राहिलं नव्हतं....

 

आपल्या सगळ्यांचीच अवस्था ना थोड्याफार प्रमाणात त्या चिमणाबाई सारखी झालीय. - म्हणजे ?

 

म्हणजे कुणीतरी आपलं माणूस आर्तपणे आपल्याला साद घालतंय हे आपल्या ध्यानिच नसतं. ह्या आपल्या माणसांमध्ये भाऊबहिणमित्रमैत्रीण, आईवडीलबऱ्याचदा पोटची मुलंही असू शकतात... त्यांची आर्त साद आपल्याला ऐकूच येत नाही …. म्हणजे ते पोटतिडकीने साद घालतात आणि आपण म्हणतो


*…'थांब ..मला जरा करिअर करु दे....*

*थांब ..जरा मला आता घर घ्यायचय...*

*थांब ..जरा मला आता कार घ्यायचीय …*

*थांब ..मला काम आहे ...*

*थांब मला तुझ्या समोर यायचे धाडस नाही...*

*थांब मी वेळ आली की तुला सगळे सांगतो...*
*थांब मला समाजात थोडी जागा मिळू दे...*

*थांब मला विश्रांती घ्यायची आहे ...*

*थांब जरा मला आता ….'*

 

 आणि *मग ही ..जंत्री वाढतच जाते.*

 

त्यांची सहन शक्ती संपते … ते त्यांचं वेगळं विश्व तयार करतात... त्या विश्वात आपल्याला स्थान नसतं... आपल्या ते लक्षात नसतं आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा …. तेव्हा…आपण फार एकटे झालेले असतो.... !! - आणि असं होऊ नये असं वाटत असेल तर?

 

🌸मला कोणाचीच  गरज नाही हा *अहंपणाबाळगु नका 🌸

 

वेळीच 'टकटक ' ऐकायला शिका. तुमच्या कडे आपुलकीने, प्रेमानी येणाऱ्या व्यक्तीला वेळ अव्यश द्या. तुमच्या तोड्याशा वेलेने व आपुलकीने कुणाचे जीवन सुखाऊ शकते. 🙏


Comments